Site icon Bhagyashri Travels

चला काश्मीरला, स्वस्त विमानप्रवासाचा लाभ घ्या !!!

kashmir tours from Pune and Mumbai

काश्मीर भारताचा शिरपेच किंवा मानाचा तुरा म्हणायला काहीच हरकत नाही. काश्मीर त्याच्या सौन्दर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. इथलेबर्फाच्छादित पर्वतरांगा. सभोवार पसरलेलं निळंभोर आकाश हे सर्व याची देही आणि याची डोळा पाहणं म्हणजे खरंच स्वर्गसुखअनुभवल्यासारखेच आहे. आणि भाग्यश्रीबरोबर काश्मीरला भेट देणं म्हणजे नक्कीच एक संस्मरणीय अनुभव.

काश्मीरमधील गुलमर्ग येथील रोप वे गंडोला मधून दिसणारे सभोवतालचे सौन्दर्य आपल्याला मंत्रमुग्ध करुन टाकते. बजरंगी भाईजानचेशूटिंग झालेले बर्फाछादित सोनमर्ग मध्ये आपल्याला हॉर्स राईडिंग,स्लेज राईडिंग अनुभवतो. श्रीनगर मधील शंकराचार्य टेकडीवरवसलेले शंकराचार्य मंदिर हे त्याच्या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. मोघल गार्डन, निशाद गार्डन, चश्मेशाही गार्डन हे तर गार्डनआर्किटेक्चरचा सुंदर अविष्कार म्हणून ओळखले जातात. पेहलगामपासून 15 कि.मी. अंतरावर, बेताब व्हॅली ही जिचे नाव सनी देवोल वअमृता सिंग यांच्या बेताब या चित्रपटामुळे ठेवले गेले अश्या सुंदर स्थळाला भेट. शिकारा राईड, हाऊस बोटीतील वास्तव्य हा तरहनिमूनर्स साठी एक वेगळा अनुभव. त्यामुळे हनिमून आणि काश्मिर हे सर्वोत्तम काँबीनेशन आहे. याचबरोबर भारतातील शक्तीपीठम्हणून ओळखल्या जाणार्‍या वैष्णवदेवीच्या दर्शनाचा लाभ आपण घेतो.

हि स्वर्गीय सहल सोयीची व्हावी म्हणून भाग्यश्री ने काश्मीर विमानाने ह्या सहलीचे आयोजन केले आहे. जाताना पुणे/मुंबई-दिल्ली-श्रीनगर तसेच परतीला जम्मू-दिल्ली-पुणे/मुंबई असा विमान प्रवास अत्यंत वाजवी खर्चात देण्यात येणार आहे. ह्यामुळे पर्यटकांचे रेल्वेप्रवासातील 4 दिवस वाचतात आणि हि दूरची सहल चक्क एका आठवड्यात पूर्ण होते. निवास व्यवस्थेसाठी डीलक्स हॉटेल्स आणि सर्वस्थलदर्शन एसी बसने आहेत. काश्मीरचे पाणी जड असल्याने पचायला आवघड असते, त्यामुळे आम्ही पर्यटकांसाठी बिस्लेरीची सोयकरतो. एवढेच नाही तर आमच्या स्वत:च्या कूक्सनी बनवलेल्या गुजराथी, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चाईनीज अश्या वैविध्यपूर्ण लज्जतदार भोजनाचा आस्वाद घेता येईल आणि तुमची काळजी घ्यायला असेल आमचा उत्साही टूर लीडर. काश्मीर विमानाने हिभाग्यश्री ट्रॅव्हल्सची पुणे/मुंबई-पुणे/मुंबई विमान प्रवासासहित सर्व स्थलदर्शन समाविष्ट असलेली ‘ऑल इन्क्ल्यूजीव्ह’ सहल आहे.म्हणजेच शॉपिंग शिवाय तुम्हाला एक रुपया देखील खिशातून काढावा लागत नाही. चला तर मग भूनंदनवन काश्मीरला.

Exit mobile version